दारुड्या जसं सामान विकतो तसे नवरत्न विकायला मोदी निघाले आहेत-प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव लोकसभा मतदार संघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दारुड्याची उपमा दिली आहे. ते म्हणाले “दारुड्या जसं सामान विकतो तसे नवरत्न विकायला नरेंद्र मोदी निघाले आहेत. मी जास्त खोलपणे काय सांगू शकतो?

“दिल्ली येथे शेतकरी आंदोलन झाले त्या ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्याच्या खिशातून लाख काढतात आणि देतात किती बारा हजार. संविधान बदलण्याचे विचार यांच्या मनात सुरु आहेत. सामान्य माणसाने निर्धार केला आहे भाजपा व त्यांच्या मित्र पक्षाला मत द्यायचे नाही. राम राम करतात आम्ही श्रीरामाला आणले आहे श्रीरामाला मत द्या. 35 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील” अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली.

शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भाजपची बी टीम असे म्हणत आहे. यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. “ते भाजपमधून आले असून ते त्यांचा इतिहास विसरले. उद्धव ठाकरे हे धर्मवादीचे सेक्युलर वादी झाले आहेत.”

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web