नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – खारघर मधील घटनेने राजकारण तापले असताना, मृत्यू झालेल्या श्रीसदस्य आणि काही विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रीसदस्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली असताना, आज एमजीएम मधील रुग्णांना भेटण्यासाठी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली त्यांना भेटून उपचार घेत असलेल्या श्रीसदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी त्यांनी राज्य सरकार , मोदी आणि शहांवर सडकून टीका करताना, एका बाजूला आमदार , खासदारांना एसी लावून बसवता आणि सामान्य नागरिकांना खाली उन्हात बसवता. कोणतेही नियोजन नसल्याने चेंगराचेंगरी झाली, यात जे नाहक बळी गेले त्या बाबत आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र आम्ही राज्यपाल, पोलीस महासंचालक, रायगड एस पी आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले असून, देशाचे पंतप्रधान अडाणी आहेत. मात्र या घटनेवरून देशाचे गृह मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा अडाणी आहेत, हे सिद्ध झाले आहे. हे खोके सरकार आले असून, हिटलर शाहीचे सरकार आले असून, परवाच्या घटनेत श्रीसदस्यांना हिटलर सारखी वागणूक दिली असून, जो पर्यंत यावर योग्य कारवाई होत नाही तो पर्यंत आम्ही हा विषय सोडणार नसल्याचे यावेळी धनंजय शिंदे म्हणाले.