सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात नाराजीचा सूर उमटला आहे.

यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला चागलेच धारेवर धरले आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना माता सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे. हे महाराष्ट्राला कळले आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही,परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा संतप्त प्रश्न जयंत पाटील यांनी केला.या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेल, शिवाय देशातील जनताही करेल असे जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web