नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी त्याची अर्ध नग्न धिंड काढून मारहाण केली होती या प्रकरणी खडक पाडा पोलिसांनी १२ आरोपीना अटक केली आहे. तीन तरुणीना कल्याण कोर्टात हजर करून त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण करुन त्याची अर्धनग्न धिंड काढल्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ५ आरोपींना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या तीन महिलांना अटक करण्यात आलं आहे. या तिन्ही महिलांची रवानगी कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात तिन्ही महिलांना कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच चार अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तीन तरुणीचा समावेश आहे. तर चार तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इन्स्टाग्रामवर जोरदार वाद सुरु होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने जो डिलिवरी बॉय काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती. दुसऱ्या गटाने या तरुणाचा शोध घेतला. त्याला शोधून काढलं आणि त्याला शुक्रवारी मारहाण केली. त्याला अर्धनग्न करुन जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नव्हे तर आक्षेपार्ह विधान आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिढीताची खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .
या प्रकरणाचा तपास कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील करत आहेत. याप्रकरणी त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. काही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करीत आहेत.त्याच प्रमाणे एसीपी उमेश माने पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि नागरिकांनी कोणीही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान करु नये. अफवांवर विश्वास ठेवून नये. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोलिसांना कळवावे कायदा हातात घेऊ नये, आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी कल्याण पोलिसांच्यावतीने उमेश माने पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण यांनी दिला आहे.