नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आरोग्य यंत्रणा बळकट केल्याचा दावा सरकार करीत असताना, एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या दहा महिन्यांमध्ये १५७ बालमृत्यू आणि ७१ उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मेळघाटात एकूण ७१ नवजातबालकांची मृत्यूंची नोंद झाली आहे. बाल मृत्यूंपैकी ६२ बालकांचा मृत्यू विविध आरोग्य संस्थां मध्ये झाला आहे. आठ बालके रुग्णालयात नेत असताना वाटेत दगावली. धक्कादायक बाब म्हणजे घरी मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ८७ इतकी आहे. अशी माहिती डॉ.सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
यावरून असे दिसून येते की आरोग्य यंत्रणा खरोखरच गर्भवती मातेवर लक्ष देतात का?. हा सवाल उपस्थित होतो. बालमृत्यु संदर्भात १९९३ पासून उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या भागात बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. पण तरी देखील या ठिकाणी डॉक्टर सेवा देत नाही. गर्भवती माता व बालकांना पुरेसा आहार मिळत नाही त्यामुळे लाखो रुपये खर्च करून देखिल बालमृत्यू थांबत नसल्याचे दिसत आहे. हा चिंतेचा विषय आहे. तर या ठिकाणी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही. त्यांच्यात समन्वय नाही, असा आरोप याचिकाकर्ते बंड्या साने यांनी केली आहे.