नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – कांदा बाजार भावातील मंदी लक्षात घेऊन. नाशिक जिल्हातील येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने मिरची व कलिंगडाचे कलिंगडाची आंतरपीक शेती करून शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची पिकाचे महत्व व मागणी लक्षात घेऊन शेततळ्याच्या पाण्यावर एक एकर शेतीत मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिकात तिखट अन् फिकी या दोन प्रकारच्या मिरचीची लागवड केली आहे.
पिकाची योग्य निगा त्यांनी राखली आहे. मिरचीला फुल,कळी चांगल्या प्रमाणत असून मिरचीला फुल,कळी चांगल्या प्रमाणत असून तोडणीला देखील आली आहे.बाजारात मिरचीला चांगली मागणी असून फिकी मिरचीला 30 रुपये किलो तर तिखट मिरचीला 50-55 किलो इतका भाव मिळत आहे.अंतर पीक म्हणून घेतलेलं कलिंगड देखील तयार झालं आहे.एकीकडे पारंपरिक पिकांची लागवड करण्याची धूम चालू असतांना अभ्यासू शेतकरी साहेबराव उगले यांनी मिरची आणि कलिंगड पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला असून यातून त्याला चार ते साडेचार लाख रुपये मिरचीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून कलिंगडातून देखील लाख रुपये उत्पन्न मिळेल.इतर पिकांच्या तुलनेत चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते असे त्यांनी सांगितलं आहे.