जळगाव/प्रतिनिधी – जळगाव शहरातील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याचा कारणावरून खून झाला होता याप्रकरणी चार जणांपैकी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती यामधील एक संशयित महिलेला १ नोव्हेंबर रोजी मनमाड येथून अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील शिरसोली नाका येथील तांबापुर परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरून 25 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस दोन गटात वाद होऊन हाणामारी व दगडफेक झाली होती. या संतापाच्या भरात चार संशयित आरोपी मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय – २०) याच्या पोटावर यांनी पोटावर चाकूने वार करत खून करण्यात आला होता. यामधील खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झालेले होते यामधील तीन जण यांना पोलिसांनी अटक केली होती तर संशयित महिला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी हीचा शोध पोलीस घेत होती. दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील गुरुद्वार जवळ संशयित अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या महिती वरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे व महीला पो.कॉ. सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आरोपी महिलेला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे।