कल्याणात महापरीवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/अशोक कांबळे – कल्याण पूर्व येथे महापरिवाराच्या वतीने वर्षावास समाप्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.वर्षावास म्हणजे काय आणि तो का करावा? वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील वास्तव आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य. बौद्ध भिक्षुकांनी पावसाळ्यातील तीन महिने धम्माचा प्रचार व प्रसार एकाचा ठिकाणी राहून करावा या उद्देशानेच भगवान गौतम बुद्धांनी वर्षावास सुरु केला. त्या मागील अनेक कारण आहेत. त्यातील प्रमख दोन कारण म्हणजे पावसाळ्यात शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात शेती करत हि पेरणी जून महिन्याच्या शेवटी करतात व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरलेल्या शेतीला अंकुर म्हणजे पालवी फुटतात अशा वेळी भिक्षु संघ मोठ्या प्रमाणात धम्माचा प्रचार व प्रसार करण्याकरीता जात यावेळी त्यांच्या पायामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत. त्याचप्रमाणे पावसाळ्यात नवीन कीटक जंतू मोठ्या प्रमाणात जन्म घेतात. भिक्षूंच्या पायाखाली येऊन लहान-मोठे कीटक मरण पाऊ नये म्हणून गौतम बुद्धांनी आपल्या संघाला पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहून धम्माचा प्रचार व प्रसार करावा याला वर्षावास म्हणतात.

याच वर्षावासाच्या निमिताने कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात महापरिवाराच्या वतीने तीन महिने बुद्ध व त्यांचा धम्म हया ग्रंथाचे वाचन रोज करण्यात आले. या वर्षावासाची समाप्ती रविवारी करण्यात आली. हया कार्यक्रमामध्ये परिसरातील अनेक उपासक उपासिका व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी महापरिवाराचे अध्यक्ष रंजन पवार, अविनाश गायकवाड, प्रभाकर जाधव, संजय तांबे, संजय धनगर, शशिकांत मुंडेकर, नितीन जाधव प्रकाश जाधव, हरिभाऊ भालेराव, अशोक कांबळे आदींनी हा कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमास लेखक नारायण सोनकांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web