नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा वाद वाढताना दिसत आहे. दादरमध्ये शनिवारी मध्यरात्री शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. आमदार सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती.ही घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिडकीन शहरातून निघून गेल्यानंतर बिडकीन शहरातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आलेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं त्याच बरोबर घोषणाही दिल्या.एकदम ओके पंन्नास खोके अशा घोषणा दिल्या. यानिमिताने पुन्हा या घोषणा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्यातील शहरात आले होते. यावेळी कार्यक्रम उरकल्यानंतर बिडकीन शहरातून निघून गेल्यानंतर बिडकीन शहरातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आलेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केल्याचा वेगळाच प्रकार घडला आहे.
शिवसेनेकांनी बकेटमध्ये गोमूत्र आणून लिंबाच्या पाल्याने ते गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे आता वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर अद्यापतरी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही
घडल्या प्रकाराबद्दल बोलताना शिवसेना कार्यकर्ते म्हणाले, की शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे लोक मोठे झालेत. मात्र, यांनी गद्दारी केली. त्यामुळे बिडकीन शहरातून गेल्यानंतर आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. ते पुढे म्हणाले की यापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आले त्यावेळी शहरातील चौकात सभा झाली. त्यावेळी कोणतीही तयारी केली नव्हती.तरही प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला भाडोत्री लोक बोलवूनही तितके लोक जमा झाले नाही. यावरुन जनतेचा कौल आमच्यासोबत असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले