नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोळशेवाडी वाहतूक उपविभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वाहतूक विभागातील अधिकारी, अंमलदार, वार्डन यांच्याकरिता अमृत महोत्सवी 5 कि. मी. दौड स्पर्धा ही चक्की नाका ते मलंगगड रोड मार्गे आर.टी.ओ चौक यु टर्न करून परत चक्की नाका अशी आयोजित करण्यात आली होती.
या अमृत महोत्सवी दौड मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास वाघ, केडीएमसी क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत, मॉडेल कॉलेजचे सुभाष गायकवाड, सिद्धार्थ विद्यामंदिरचे प्रवीण खाडे, आयडियल कॉलेजचे सुधाकर ठोके, साई इंग्लिश स्कूलचे शशिकांत पाटील, साकेत महाविद्यालयचे चौधरी, कमलादेवी महाविद्यालयाचे काळे आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते यांना प्रमाणपत्र, मेडल व तिरंगा ध्वज देऊन सन्मानित करण्यात आले.