नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक, वीजबिलाबाबत वाद व वीज चोरीच्या दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका स्तरावर शनिवारी दिनांक १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोक अदालतीत सहभागी व्हावे लागणार आहे. लोकादालातीच्या माध्यमातून वीज विषयक असणारी प्रकाराने आपणाला मिटवता येऊ शकणार आहेत.
परिमंडलातील संबंधित ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिस मिळाली नसेल तरीही संबधितांना अदालतीत सहभागी होता येईल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना विलासराव देशमुख अभय योजनेतून व्याज व दंड माफी सोबतच थकीत रकमेत अनुक्रमे ५ व १० टक्के सवलतीचा लाभ मिळवून वीजपुरवठा पुर्ववत करून घेण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.