नेशन न्यूज मराठी टीम.
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालट झाली आहे. शिवसेनेच्त्याया चाळीस आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन करत भाजप सोबत सरकार बनवले आहे. शिवसेनाला यात राजकीय मोठे नुकसान होताना आपल्याला दिसले आहे.यात पुन्हा शिवसेनेची वज्रमुठ बांधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली आहे.
त्यातच उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे हल्ला झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत, “निष्ठा यात्रेसोबतच फटके यात्रा काढण्याचा वेळ आला आहे”, तरच “म्याऊ” “म्याऊ” बंद होईल! हीच ती वेळ! अशा आशयाचे ट्विट केले होत. याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देत अजून निष्ठा यात्रा संपलेली नाही त्यामुळे नितेश राणे यांची जी भूमिका असेल शिवसेना सुद्धा त्यांना त्याच भूमिकेतून उत्तर देईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे