नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – अंतिम निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) विविध पदांसाठीच्या कागदपत्रे पडताळणीला टपाल विभागाने 15 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आसाममधील पूरस्थितीमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात विभागाने म्हटले आहे की, आसाममधील पूरस्थिती लक्षात घेऊन,विविध पदांकरता अंतिम निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत 30 जून ऐवजी 15 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.