नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – एन आर सी स्कूल मोहने काँलनी येथील शाळेत शिकलेल्या दहावी बँच १९८५ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या रविवारी संपन्न झाला. तब्बल ३७ वर्षोनंतर आपल्या शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देत प्रौढात्वाकडे वाटचाल करीत असलेली कामाधंद्यानिमित बाहेरगावी राहणारी शालेय मित्र मडंळी मेळाव्या निमित्त एकत्र आली. होती. रविवारी शाळेच्या प्रागंणात आजी विद्यार्थीनी भव्य रांगोळी काढुन या माजी विद्यार्थीचे स्वागत केले. शाळा परिसरातील स्वच्छता मन प्रसन्न करीत होती. सकाळी १०.३०.वा.सुमारास माजी विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात शाळेचे रजिस्टार सुरेश नाईक सर यांच्या हस्ते सरस्वती पुजन ,दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
माजी विध्यार्थ्यांच्या आपल्या शाळेबद्दल असलेला जिव्हाळा, अभिमानाचे कौतुक नाईक सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. १९८५ दहावी बँचचे हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना व शाळेतील दिवगंत झालेल्या शिक्षकांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेची प्रार्थना एकत्रित घेण्यात आली . पुढील सत्रात उपस्थित १९८५च्या दहावी बँचँच्या माजी विद्यार्थ्यांचे परिचय क्रार्यक्रम करण्यात आला.
यानंतर मज्जा मस्ती करत सर्व विद्यार्थ्यानी गाणीही गायीली. यामध्ये माजी विद्यार्थी शरद जावळे, सुरेखा पागरे, अनिता वन कुन्र्दे, देवीदास पाबळे समावेश होता. माजी विद्यार्थीनी कविता सादर केली. त्या नंतर शालेय गत जीवनातील आठवणीसह आताचे जीवन प्रवासच्या आठवणीच्या गप्पा रगंल्या , उपस्थित ५८ माजी विद्यार्थीनी एकत्रपणे शाळेतील वर्गात, लायब्ररीत व प्रयोग शाळेत जाऊन जुण्या आठवणीना उजाळा दिला.
संध्याकाळी माजी विद्यार्थ्यानी क्रार्यक्रमांची सांगता पसायदान, राष्ट्रगीताने केली. आणि आपल्या शालेय जीवनातील आठवणीची शिदोरीतील उजाळा देत आपल्या प्रांपचिक सुख दुखाचा गोष्टी मनमोकळ्या करीत भावनिक होत मैत्रीची नाळ कायम ठेवणार असे वचन देत भावुक अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. माजी विघार्थी मेळाव्याच्या क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवि साठे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वदंना पगारे, तानाजी लावंड, रविंद्र कवडे, अविनाश नेवे आणि सहकारी माजी विघार्थीनी केले असल्याने या माजी विद्यार्थी मेळाव्या निमित्त अवघा रंग एक झाला असे चित्र एन आर सी शाळेत रविवारी दिसत होते.