नेशन न्यूज मराठी टीम.
मालेगाव – देशात इतर राजकीय पक्षांनी जातीयवादी भूमिका घेत समाज मनावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडी, नाशिकपुर्वच्या वतीने मालेगाव शहरात शांतता मार्चचे आयोजन करण्यात अआले होते
यात वंचित बहुजन आघाडीचे तालुका व शहर पदाधिकारी,कार्यकर्ते सामील झाले.वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा प्रकाश आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजात दूही माजवणाऱ्या व त्यातून आपल्या स्वार्थासाठी भोंगा,हनुमानचालिसा पठण या सारख्या धार्मिक विषयावर बोलून राजकीय पोळी शेकणाऱ्या पक्षांच्या भूमिकांमुळे व्यथित शांतता प्रिय लोकांच्या मनात,येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाध्यक्ष कपिल आहीरे व महासचिव संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सदर शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यात कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा चेथावनीखोर घोषणा न देता हा शांतता मार्च म.गांधी, म.जोतिबा फुले, छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिकपणे वाचन करून मार्चची सांगता करण्यात आली.यावेळी जिल्हा सचिव रुपेश पटाईत,सदस्य प्रा.राजेंद्र पवार, प्र.प्रमुख.मनोज आहीरे,शहराध्यक्ष कैलास लोहार,तालुका महासचिव शशिकांत पवार,दिलीप सोनवणे,विजय बिऱ्हाडे,अलीम शेख, जव्वाद शेख,आकाश सुरवाडे, सिध्दार्थ उशिरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.