नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याणात भाजपा कार्यकर्ते अरूण दिघे यांच्या स्मरणार्थ जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. खेळाडू वृत्ती असल्यास जीवनात कोणत्याही समस्येला समोरे जाता येते असे प्रतिपादन केले.
कल्याण पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि हनुमान सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी फडणवीस यांनी कबड्डी हा आपल्या मातीतील देशी खेळ आहे. या प्रकारच्या स्पर्धा आयोजनातून कबड्डी खेळणारे खेळाडू हे तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर जावेत अशी आपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या मातीत कबड्डीचे चांगले खेळाडू घडले असल्याचे सांगितले .या उदघाटन कार्यक्रमास आमदार गणपत गायकवाड ,आमदार रवींद्र चव्हाण ,माजी आमदार नरेंद्र पवार , जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते .ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. त्यासाठी कल्याण डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर ठाणो आणि भिवंडी परिसरातून ६४ कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये महिला कबड्डी संघांचाही समावेश आहे.