सौंदाना गावात दिडशे एकर ऊस जळून खाक

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – सौंदाना गावात अचानक लागलेल्या आगीत 40 शेतकऱ्यांच्या दीडशे एकर क्षेत्राला आग लागून पूर्णपणे यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात सध्या ऊस जाळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत केज तालुक्यातील सौदाना गावात 40 शेतकऱ्यांच्या दीडशे एकर शेतामध्ये असलेल्या उसाला अचानक आग लागून यात लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांच झाल आहे’

सातत्याने ऊस जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाच्या शेतावरून महावितरणच्या तारा गेल्या आहेत अचानक ठिणग्या पडून उसामध्ये पेट घेतला जात आहे आणि यात हजारो एकर क्षेत्र जळून खाक होत असल्याच्या घटना घडत आहेत असा आरोप गावकरी करत आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web