लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८७८ प्रकरणे निकाली,२ कोटी ७१ लाखांचा भरणा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – तालुका व जिल्हा न्यायालयात आयोजित लोकअदालतीतून महावितरणच्या कल्याण परिमंडलात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १८७८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली आहेत. महावितरणच्या उपलब्ध सवलती तसेच विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी २ कोटी ७१ लाख रुपयांच्या थकीत रकमेचा भरणा केला.

कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित जवळपास ३ लाख ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले हाते. त्यासोबतच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. परंतू १८७८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व २ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा होऊ शकला. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात १२८ ग्राहकांनी थकीत २८ लाख रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत सर्वधिक एक कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी भरणाऱ्या ८८४ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई व विरारमधील २२५ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत २७ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत ६४१ ग्राहकांनी ४७ लाख ९७ हजार रुपयांची थकीत रक्कम भरून आपली प्रकरणे निकाली काढली.


Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web