नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे २०० फूट लांब असलेला वानरलिंगी सुळखा या दोन्ही कड्यांच्या सुमारे एक हजार फूट उंचावरुन लटकून झिप्लायनिंगच्या मदतीने कल्याणचे गिर्यारोहक भूषण पवार आणि नीतेश पाटील यांनी पर्यावरण वाचवा संदर्भातचा सामाजिक संदेश दिला.
नाणेघाटाच्या पायथ्यापासून ट्रेकला सुरुवात होताच सुमारे एक तासाची पायपीट केल्यावर जीवधन किल्ल्याचे वैभव डोळ्या समोर येते. त्याच सोबत किल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर दिसतो तो ४५० फुटांचा वानरलिंगी सुळखा. जीवधन किल्ल्याचा माथा गाठण्यासाठीची सुरुवातचं ही घनदाट जंगलातून होतं असल्याने विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांची भीती ही असतेच. ह्या सर्व गोष्टींवर मात करून कल्याणच्या या दोन्ही गिर्यारोहकांनी एक सामाजिक संदेश दिला.
व्हॅली क्रॉसिंग म्हणजे दोन गडांच्या मधील अंतर हे दोरीला लटकून पूर्ण करणे. जीवधन आणि वानरलिंगी मधील अंतर हे सुमारे २०० फूट उंच असून जमिनीपासून एक हजार फूट उंच आहे. जरा चूक झाली तर सरळ दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जोखमीच्या मोहिमेत सुरक्षा प्रथम प्राधान्य ठेवलेले असते. झिप्लायनिंग करून वानरलिंगी सुळख्या वर पोहचताच कल्याणच्या या दोन्ही गिर्यारोहकांनी पर्यावरण वाचवा म्हणून एक सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम केला. त्यांना विशेष साथ लाभली ती एसएल ऍडव्हेंचरच्या लहू उगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची.
राज्यात ठिकठिकाणी असलेला गड त्यांच्या सोबत मानवाने आपल्या स्वार्थासाठी उत्खनन करून गडाचं पावित्र्य हे धोक्यात आणले आहे. त्यात सर्वप्रथम स्थान मिळते ते श्री हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी किल्ल्याचे. पर्यावरण धोक्यात घालून आपणच आपले भविष्य धोक्यात आणतोय असे भूषण पवार यांनी सांगितले. दिसायला जरी बारीक असली तरीही या रोप वर पूर्ण विश्वास असल्याने,पडण्याची भीती अजिबात वाटतं नाही असे मत नितेश पाटील यांनी व्यक्त केले.