शहापूर/प्रतिनिधी – तमिळनाडू मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे पहिले तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळचा माहुली किल्लावरील ”वजीर सुळका” या खडतर उंच टोकावर जाऊन पडघा येथे राहणारे , महाराष्ट्र सुरक्षा बल जवान मयुर वाघ यांचा सह १२ तरुणांनी सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.
दक्षिणोत्तर पसरलेला शहापुर जवळील माहुली किल्ला त्याच्या दक्षिणेकडील टोकाला मुख्य डोंगर रांगे पासून असलेला ”वजीर सुळका” टोक आहे. या टोकाचे वैशिष्ट्य म्हणजे 90° अंशाच्या सरळसोट आकारामुळे प्रत्येकाला भारावून टाकतो. याच टोकावर जाऊन महाराष्ट्र सुरक्षा बल जवाणासह १२ युवकांची जनरल बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
अनिकेत घाडीगावकर, साहिल भोगले, मंदार सिनकर, दत्तात्रय थळे, ईशान थळे , शिवलाल मंत्री, स्वप्निल जोगदनकर, माधव गोसावी, संकेत साळुंके, सुजाता थोरात, भूषण जाधव, विक्रांत या युवकांनी सीडीएस बिपीन रावत यांना भारताचा राष्ट्रध्वज फडकून अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.