कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची मोहीम राबवणार आहे. तसेच, तृतीय पंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्या नाव नोंदणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवली जात आहे त्यानुसार  कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.

केंद्र शासनाने व राज्य शासनाने तृतीय पंथीयांना समानतेचा हक्क दिला असला तरी  आजही समाजात तृतीय पंथी याची अहवेलना होताना दिसून येत आहे.तृतीय पंथीयांची जनगणनेत नोंद व्हावी व त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी शासना कडून तृतुय पंथीयांची मतदार नोदणी करण्यात येत आहे. कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते तृतीय पंथीयांनी मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद दिला १०० च्या वर यात नोदणी झाली आहे.

मतदार यादीत नाव येणे म्हणजे आम्हाला कुठेतरी समानतेची वागणूक मिळत आहे.तसेच समानतेच्या हक्कासाठी व अधिकारासाठी ते गरजेचे आहे असे मत किन्नर अस्मिता संस्थेच्या तम्मना केने यांनी व्यक्त केले,त्याच बरोबर जास्तीत जास्त तृतीय पंथीयांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहनही केले. ज्या तृतीय पंथीयांना आपले नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे त्यांनी किन्नर अस्मिता संस्थेची संपर्क करण्याचे सागितले आहे.

यापूर्वी आमच्या कडे एकही कायदेशीर ओळखपत्र किवा कागदपत्र नव्हते तृतीयपंथी समाज असा आहे कि त्याची आधीची ओळख तो मागे ठेऊन नवीन ओळख त्याला निर्माण करावी लागते. पण कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे ते खूप आवघड होऊन बसले होते. साधे मोबाईल सीम कार्ड घेण्यासाठी खूप त्रास व कसरत करावी लागत होती. पण आता सरकारने जी मतदार यादीत नाव नोंदणीची संधी दिले आहे त्यामुळे आम्हाला आमची एक ओळख मिळणार आहे. आम्हालाही मुख्य प्रवाहात घेतल्याची आता जाणीव होत आहे. अशी भावना किन्नर अस्मिताच्या नीता केने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.त्याच बरोबर निवणूक आयोगाचे खूप खूप धन्यवाद मानले.

निवडणूक मतदार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यानी मतदार नोंदणीला तृतीयपंथीयांचा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web