कल्याण/संघर्ष गांगुर्डे – राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याच्यातच नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशकंदील लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशकंदील आणि रांगोळीच्या माध्यमातून आकाशकंदील आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. जसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा असे काही नियम ठेवत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांसाठी लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत विजयी स्पर्धकाला प्रथम बक्षीस अकरा हजार चे द्वितीय बक्षीस सात हजार व तृतीय बक्षीस पाच हजार चे असून स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विशेष मध्ये या स्पर्धेत कुणीही भाग घेऊ शकणार आहे आज या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सहभाग घेतला असून महानगरपालिकेच्या मुख्यालया बाहेर डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट,मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन चे प्रतीकात्मक रांगोळी व आकाश कंदील बनवून महानगरपालिके बाहेर लावत नारळ फोडून स्पर्धेत भाग घेतला असून लवकरच कल्याण डोंबिवली परिसरातील जास्तीत जास्त मतदारांची नावे मतदान यादीत नोंदणी करावी यासाठी शाळा कॉलेज व विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवनार असल्याचे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पालिका सचिव संजय जाधव यांनी सांगितले.राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जास्तीत जास्त मतदार जनजागृती व्हावी या मागचा उद्देश आहे.पालिकेने केलेल्या अवाहनाला सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.