डोंबिवली लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपींना फाशीची मागणी

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील लैगिक आत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांशी व संबधित पोलीस अधिकारी यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज डोंबिवली येथे भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितले की झालेली घटना अत्यंत दुर्देवी आणि गभीर आहे.पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे. सर्वच ३३ आरोपींना अटक झालेली आहे.पिडीतेला राज्य सरकार कडून १० लाख मदत मिळणार आहे पण आमची मागणी पिडीतेला  २० लाखाची मदत मिळावी. पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार आहे.त्याचं बरोबर रामदास आठवले यांनी डोंबिवलीकरांना पीडितेला मदत करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी आरपीआय पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश पीडितेच्या कुटूबियांना दिला असल्याचे आठवले यांनी सागितले,

पोलिसांनीही सर्व आरोपींना अटक करून त्यांचे काम चोख केले आहे पोलिसांना या केसची चार्टशीट लवकरात लवकर न्यायालयात दाखल केली पाहिजे त्याच बरोबर राज्य सरकारनी हि केस जलदगती न्यायालयात चालवावी, त्यासाठी चांगला सरकारी वकील या केससाठी द्यावा.अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सागितले.

पीडितेच्या कुटुबियांना न्यायाची मागणी करत आरोपीच्या फाशीची मागणी केली आहे आणि तीच मागणी आपण राज्यसरकार कडे करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. पीडितेच्या कुटूंबाचा घराचाही प्रश्न आहे त्यासाठी म्हाडा अधिकारी याच्याशी चर्चा करणार आहे असे आठवले यांनी सांगितले. झालेला प्रकार हा फार गंभीर असल्यामुळे पीडित कुटूबियांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. शेवटी त्यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web