कल्याण/प्रतिनिधी – संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रूपयाचा माणहणीचा दावा करणार त्यांची तेव्हढीच किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही असा टोमणा मारला .राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत बोलताना रामदास आठवले यांनी
सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, संजय राऊत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत ,शिवसेनेचे प्रवक्ते ,नेते आहेत त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही अस सल्ला राऊत याना दिला .अनंत गीते यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना आठवले यांनी अनंत गीते यांनी देखील शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय , मात्र 1998 मध्ये शरद पवार यांना काँग्रेस मधून काढलं होतं त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर काँग्रेसने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले
महाविकास आघडीच्या सरकारमध्ये आपापसात आरोप सुरू आहेत ,किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या अनियमितता भ्रष्टाचार बाबत तक्रार करत ईडी ला पुरावे दिले आहेत ,साखर कारखाने व इतर उद्योग करायला काही हरकत नाही मात्र त्यात भ्रष्टाचार ,अनियमितता असता कामा नये अस स्पष्ट केले तर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतेक आमदार मंत्री भाजप मध्ये गेलेत याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी असे आमदार मंत्री भाजप मध्ये आले असतील तर इतरांनी जर त्यांचे पुरावे असतील बाहेर काढावेत अस आवाहन विरोधी पक्षांना केलं