कल्याण/प्रतिनिधी – राज्यातील महाविकास आघाडीमधील दिग्गज मंत्र्यांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केडीएमसीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या घोटाळ्यांची लवकरच आपण काळी पत्रिका काढणार असल्याचे सांगत सोमय्या यांनी केडीएमसीला लक्ष्य केले आहे. भाजप कल्याण जिल्हा कार्यालयात झालेल्या पदाधिकऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
कल्याण भाजप पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर किरीट सोमय्यांनी आपला मोर्च्या आता केडीएमसी कडे वळविल्याचे दिसून आले. आज आपण आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार ,जगन्नाथ पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये कोवीड काळात केडीएमसीने केलेल्या कामाची तपासणी करण्याबाबत भाजप आणि तज्ञ मंडळींची समिती बनवणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची काळी पत्रिका बनवून किती घोटाळे झाले हे जाहीर करणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या विरोधात शिवसेना नेते अनिल अरब ,राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ मानहाणीचा दावा करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं .याबाबत बोलताना किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत आता पर्यंत मानहानीच्या सहा नोटीसा आल्या आहेत ,ठाकरे सरकार वसुलीपण १०० कोटींची करते आणि नोटीस पण १०० कोटींची करते ,उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना मी घाबरत नाही ,सरकारचे घोटाळे तडीस नेणार .उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा १९ बंगल्याच्या घोटाळ्यासह अनिल परब चा रिसॉर्ट असो की हसन मुश्रीफचा साखर कारखाना असो ,या सगळ्या घोटाळ्याना तडीस नेणार आणि सगळ्यावर योग्य ती कारवाई होणार ,हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखाना बेनामी साखर कारखाना आहे,त्याच्यावर कारवाई करावी अशी मागनी इन्कम टॅक्स विभाग आणि इडी कडे केली आहे आणि त्याची चौकशी सुरु झाली आहे अस सांगितलं .तर केडीएमसीचे भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात तरुणीने केलेल्या आरोपा नंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बोलताना सोमैय्या यांनी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्यावर कायद्या प्रमाणे योग्य चौकशी व्हायला हवी अस स्पष्ट केलं.