कल्याण मध्ये चिटफंड कंपनीच्या मालकांवर फसवणुकीचा गुन्हा,ग्राहकांना ६६ लाखाचा घातला गंडा

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या मालकांविरुद्ध पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रहिवासी शालिनी  पाटील नामक महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवलीतील निवासी विभागात राहणाऱ्या शालिनी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीचे मालक वीरथ गोपालन नायर, पत्नी वत्सला नायर आणि मुलगा गोविंद नायर यांनी गुंतवणूकदारांची तब्बल 66 लाख 36 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे.

यापूर्वी बीएसएनएल कंपनीतून निवृत्त झालेले कल्याणचे रहिवासी सुधाकर उगडे नावाच्या व्यक्तीची 40 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 15 टक्के व्याजाचे आमिष दाखवले होते. ज्यामध्ये शालिनी पाटील यांनी 2006 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान 66 लाख 36 हजार रुपये गुंतवले होते. कर्ज पूर्ण झाल्यानंतरही व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीचे मालक ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या अनेक शाखा आहेत. 15 वर्षांपूर्वी 2006 मध्ये कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात ही शाखा सुरू झाली होती. सध्या शालिनी पाटील यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी कंपनीचे संचालक वीरित गोपालन नायर, पत्नी वत्सला नायर आणि मुलगा गोविंद नायर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web