केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पाठोपाठ,राष्ट्रवादीचाही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे -कल्याण डोंबिवली महापालिका सध्या प्रशासकीय राजवट आहे. महापालिका निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची चाचपनी सुरू आहे .काँग्रेसने काही दिवसांपूर्वी येत्या महापालिका निवडनुका स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती .त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने देखिल स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महा विकास आघाडी सत्तेत असताना याआधीच कॉंग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा देत पडल्याने आता शिवसेना याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

केडीएमसी निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची प्रभाग स्तरावर तयारी सुरु झाली आहे. कॉग्रेस नंतर आत्ता राष्ट्रवादीने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला आहे. पार्श्वभूमीवर   संपूर्ण 122 प्रभगसाठी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. वार्ड क्रमांक 25 मधील रामदासवाडी येथे आज कार्यकर्त्यांचा  मेळावा आयोजित करण्यात आला होता . या प्रभागासाठी उमेदवारी सुद्धा याठिकाणी निश्चित करण्यात आली.कल्याण डोंबिवलीत विधायक कामे झालेली नाहीत. अजूनही बीएसयूपीतील घरे नागरीकांना दिलेली नाहीत. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. अनेक भागात स्वच्छता विजेचा आणि पाण्याचा प्रश्न आहे अशी टिका शिंदे यांनी यावेळी केली आहे.या निवडणूका स्वबळावर लढवल्या जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.आमची भूमीका स्वबळाची आहे. त्या आधारे प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहेत त्यामुळे पुढचा निर्णय पश्रश्रेष्ठी घेतील त्यांचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल असे शिंदे यांनी सांगितले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web