कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून कल्याणच्या अत्रेरंगमंदिर आणि डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले या दोन सेंटरवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे वॅक्सीन घेण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी 9 वाजता लसीकरणासाठी कुपन सुरु करण्यात आलं मात्र अर्धा तासातच कुपन संपल्याने संतापलेल्या नागरिकांनी एकच गोधळ घातल्याने अखेर तातडीने पोलिसांना बोलवावं लागलं पोलिसांच्या मध्यस्थी नंतर नागरिक शांत झाले. पण प्रशासनाचा कारभारात नियोजन नाही असे अनेक सवाल नागरिक करत आहेत.