समाजवादीच्या आमदारांचे विधिमंडळ प्रवेशद्वारावर आंदोलन

मुंबई /संघर्ष गांगुर्डे – राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनादरम्यान समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी तसेच भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी जुलै महिन्यात येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाबाबत राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकातील बाबी व मार्गदर्शक सुचनांमध्ये संभ्रम असून या सूचना स्पष्ट पाने नमूद कराव्यात या मागणीसाठी सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केले. यावेळी बकरी ईद सणाबाबत अध्यदेश सुस्पष्ट करावे अशी मागणी समाजवादीच्या या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
 कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्यरत आहे. त्यानुसार निरनिराळ्या बाबींवर निर्णय घेतले जात असून या निर्णयात या वर्षीच्या बकरी ईद सण साजरा करण्याबाबत राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना सादर केल्या आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी १७ जुलै,२०२० रोजी शासनाच्या गृह विभागाच्या शासन परिपत्रकानुसारच या सूचना आहेत. त्यामधील काही सूचनांबाबत अद्याप देखील अस्पष्टता असल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अनन्य साधारण महत्त्व असणारा बकरी ईद सण साजरा करण्याविषयी यावर्षी देखील संभ्रम निर्माण झाला असून त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे समाजवादीच्या आमदारांनी म्हटले आहे. 
 राज्य शासनाच्या सुचनांमध्ये जनावरे खरेदी बाबत उल्लेख आहे परंतु जनावरांमध्ये बकरा, मेंढी,  म्हैस असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच प्रतिकात्मक कुर्बानी बाबत प्रतिकात्मक शब्दाचे सुस्पष्ट स्पष्टीकरण करण्यात यावे. शासकीय नियमानुसार प्रत्येक व्यक्तीने कुर्बानी संदर्भात कत्तलखाण्याची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी जागेमध्ये अथवा राहत्या संकुलामध्ये बकरा, मेंढी किंवा म्हैस यापैकी जनावरांची कुर्बानी द्यावयाची असल्यास त्या संधार्भीय परवानगी कोठून व कधी घ्यावयाची आहे याबाबत मार्गदर्शक सूचना असणे आवश्यक आहे. फार्महाऊस पासून ते कुर्बानी देण्याच्या ठिकाणापर्यंत जनावरांची वाहतूक करण्याबाबत मार्गदर्शक सुचना असणे आवश्यक आहे. जनावरांच्या वाहतुकीदरम्यान प्रत्येक टोल नाक्यांवर प्रत्येक वेळी होणारा नाहक त्रास न होण्याकरिता मार्गदर्शक सुचना असणे आवश्यक आहे. मुस्लिम बहुल छोट्या शहरांमध्ये जेथे कत्तलखाना उपलब्ध नाही किंवा कार्यरत नाही. उदा.भिवंडी सारख्या शहरामध्ये एक कत्तलखाना उपलब्ध असून तो सध्या कार्यरत नसल्याने नागरिकांना सण साजरा करण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी अशा ठिकाणी मोठया जनावरांची जसे म्हैस कुर्बानी करीता तात्पुरत्या स्वरूपातील कत्तलखाना उपलब्ध करण्यात यावा. 
अशा मागण्या समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी तसेच भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी सोमवारी विधिमंडळ अधिवेशनदरम्यान केल्या.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web