प्राण जाये पर पाणी न जाय -काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर /प्रतिनिधी – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनासह राजकीय पक्ष आक्रमक झाले असून आता या वादात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनीच्या पाण्यासाठी प्राण जाये पर पाणी न जाय अशी भूमिका घेतली आहे.
येत्या जून,जुलै,आगस्ट महिन्यात सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे.उजनीच्या पाण्याची गळती होत असून येत्या एक महिन्यात उजनीच्या गळतीची दुरुस्ती करून ताबडतोब सोलापूरकराना हक्काचं पाणी मिळाले पाहिजे.यामध्ये कुठला अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या हक्काच ५ टीएमसी पाणी इंदपूरला पळविल्याचा आरोप होत असून त्याअनुषंगाने आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.याआधीही पाण्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता.उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच सोलापूर विरुद्ध मराठवाडा यांच्यात वाद सुरू आहे.पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यावरून वाद पेटला असून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलने सुरू आहेत.त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web