कवितेतून सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती   साजरी 

भिवंडी /प्रतिनिधी– कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण  महाराष्ट्र पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन होत असताना सरकारी नियमाचे पालन करून भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी मिलिंद जाधव यांनी ”भिमाचे विचार सांगतोय गाण्यात” अशी कविता सादर करत सामाजिक संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरीच साजरी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून युवा कवी मिलिंद जाधव यांनी घरातच आपल्या परिवारासोबत जयंती साजरी केली आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कवितेतून अभिवादन केले आहे. 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर  प्रत्येकजण सद्या घरातूनच आपल्या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता, गाणी सादर करून प्रबोधन करीत असतो. असाच एक प्रयत्न मी सोशल मीडियावर कविता सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कवितेतून मांडण्याचे प्रयत्न केला आहे. 

.महात्मा ज्योतिबा  फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा केंद्रांवर पंचवीस गावे मिळून मोठ्या उत्साहात  संयुक्त जयंती साजरी केली जाते. परंतु  कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करत पडघा विभातील नागरिकांनी घरोघरीच आपल्या परिवारासोबत महामानवांची आपल्या परिवाराला माहीत देत क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती वैचारिक पध्दतीने साजरी करून क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web