प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत रायता या गावाजवळ असलेल्या उल्हास नदीवरील पुलाखाली एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसाना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी घटनेची प्रथम नोंद करून तपास सुरू केला आहे नक्की ही आत्महत्या की हत्या? याचा गूढ तपासा नंतर उलगढणार आहे.
कल्याण मुरबाड रोडवर असलेल्या रायता गावाजवळ असलेल्या रायता नदीच्या पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हा पुरुषाचा असून अंदाजे वय ४०- ते ४५ असावे तसेच दोन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मात्र अपघात की घातपात या बाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून .दरम्यान घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उप निरीक्षक प्रदिप आरोटे करत असल्याची माहिती सांगण्यात आले आहे .