मनसेच सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू – संदीप देशपांडे

प्रतिनिधी.

कल्याण – सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे चे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली या प्रकरणी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी होती या सुनावणी साठी संदीप देशपांडे आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले होते .यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी आम्ही जे आंदोलन केले ते लोकहितासाठी केलं ,कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत,मात्र त्यानी हे लक्षात ठेवावं ज्यावेळेला राज साहेबांचं सरकार येईल.तेव्हा हा सर्व हिशोब चुकता होईल आता जो जों त्रास देतोय ते लक्षात ठेवतोय असा इशारा दिला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web