प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेला एकमेव पोस्ट ऑफिस असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.छोट्या जागेमुळे सोशिअल डिस्टसिंग पाळले जात नाही आहे.तसेच सर्व्हर स्लो असल्यामूळे नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तासंतास रांगेत तिष्ठत उभे रहावे लागत आहे.कर्मचारी अपुरा असल्यामुळे व रजेवर जात असल्यामूळे ठरावीक खिडक्यांवरच काम सुरु, त्यामूळे कामांना विलंब होताना दिसतो आणि नागरिकांना पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत आहेत.अश्या काही अडचणी नागरिकांनी मनसे पक्षाकडे कळवल्या.तात्काळ प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर , संदीप म्हात्रे यांनी पोस्ट ऑफिस गाठत पोस्ट अधिकारी यांची भेट घेतली.डोंबिवली पूर्वेस ५ पोस्ट कार्यालय मग डोंबिवली पश्चिमेस १ च कार्यालय देऊन अन्याय का? असा सवाल करीत नागरिकांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष न करतात लवकरात लवकर कर्मचारी वर्ग वाढवून सेवा जलद द्यावी व डोंबिवली पश्चिमेस निदान अजून दोन पोस्ट कार्यालय नव्याने सुरु करावी अशी मागणी केली आहे.यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, संदीप म्हात्रे, सचिन कस्तुर,उदय चेऊलकर, राजेश दातखीळ पाटील आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
