प्रतिनिधी.
कल्याण – गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी रूटमार्च काढला. यामध्ये एस.आर.पी.एफ.चे २०० जवान, पोलीस स्टेशनचे १०० जवान, ५० अधिकारी यांचा समावेश होता. येणारे सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावे हे जनतेला आश्वस्त करण्यासाठी या रूटमार्चचे आयोजन केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या रूटमार्च दरम्यान पोलिसांनी सोशल डीस्टन पाळत नागरिकांनी देखील सण उत्सव साजरे करतांना सोशल डीस्टन पाळण्याचे आवाहन केले. कोरोना महामारीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये प्रत्येक धर्मियांनी आपआपलं सण उत्साह सामाजिक सलोखा राखून साजरा करावा हा रुटमार्च चा उद्देश्य असल्याचे दिसून आले.