पुणे, दि. १५ राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल आहे.गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. वाहनांची सोय होत नसल्याने अनेक मजूर कुटुंबासमवेत पायीच आपल्या घरी जायला निघाले आहेत. रखरखत्या उन्हात, हे मजूर मजल दरमजल पायपीट करीत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या मजुरांसाठी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पाणी आणि जेवणाची सोय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावी. सरकारने अशा स्थलांतरित मजुरांसाठी सर्व सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे महामार्गावर राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तातडीने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा, तालुका आणि गाव कमिटी अध्यक्षांना केली आहे.