कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २३ तारखेचा दहावीचा पेपर रद्द – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

मुंबई :- सोमवार २३ तारखेला सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा  सोमवारी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे आणखी ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाचे ६३ रुग्ण झाले आहेत. यातले १० रुग्ण मुंबईचे तर १ रुग्ण पुण्याचा आहे. ६३ पैकी १४ लोकांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. तर बाकीचे रुग्ण हे परदेशातून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web